उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना दिला आहे अलर्ट
पुणे : बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रता देखील वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे . आज म्हणजेच शनिवारपासून पुढील 4-5 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे . विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा (heay rain) इशारा देण्यात आला आहे . घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे . भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.
साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.
जळगाव, धुळे, नंदुरबार सावधान
दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.